काल सारंगदाने १९८२ साली आलेल्या विजेता या चित्रपटाच्या अनुषंगाने एक अप्रतिम लेख लिहिला होता. त्या लेखकाने या चित्रपटाच्या आठवणी जाग्या केल्या. मग पुन्हा काळ दिवसभर “मन आनंद आनंद छायो” ची पुनरावर्तने होत राहिली. काही गाणी आपण ऐकतो. काही गाणी आपल्याला गुणगुणावीशी वाटतात. पण काही निवडक गाणी अशी असतात की ती ऐकताना नकळत डोळे मिटतात, श्वास संथ होतो आणि मन एका वेगळ्याच शांत प्रदेशात पोहोचते. “मन आनंद आनंद छायो” हे असेच एक गीत आहे.
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या विजेता या चित्रपटातील हे गाणेP. गोविंद निहलानी दिग्दर्शित आणि शशी कपूर निर्मित हा चित्रपट एका तरुणाच्या आत्मशोधाची कथा सांगतो. जीवनातील गोंधळ, अपयश, आत्मविश्वासाचा अभाव आणि त्यानंतर स्वतःचा शोध घेत पुन्हा उभे राहण्याचा हा प्रवास आहे. या प्रवासातील अंतर्मनाचा उजेड म्हणजे हे गीत.
या गीताचे शब्द लिहिले आहेत कवी वसंत देव यांनी. त्यांच्या लेखणीत साहित्य, अध्यात्म आणि भारतीय संस्कृतीची खोल जाण होती. त्यामुळे या गीतातील प्रत्येक शब्द फक्त सुंदर नाही, तर अर्थपूर्ण आहे. येथे “आनंद” हा क्षणिक सुखाचा नाही, तर अंतःकरणात जागणाऱ्या आत्मानंदाचा आहे. अंधार म्हणजे केवळ रात्र नाही, तर मनातील अज्ञान, संभ्रम आणि अस्वस्थता आहे. पहाट म्हणजे केवळ उगवता सूर्य नाही, तर नव्या जाणिवांचा आरंभ आहे.
या शब्दांना सुरांची अमूल्य साथ लाभली ती अजित वर्मन यांच्या संगीताची. चित्रपटसंगीतात शास्त्रीय संगीताचा वापर करताना अनेकदा लोकप्रियतेसाठी काही तडजोडी केल्या जातात. पण या गाण्यात तसे कुठेही जाणवत नाही. रागाची शुद्धता जपत त्यांनी चित्रपटाच्या भावविश्वाशी पूर्णपणे सुसंगत अशी रचना केली आहे.
आशा भोसले आणि पं. सत्यशील देशपांडे यांच्या सुमधूर आणि चिंतनात्मक सूरांनी सजलेले हे गीत आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेवून जाते. आशाताईंचा आवाज आपण अनेक रंगांत ऐकला आहे. खट्याळ, रोमँटिक, गझल, भावगीत, लोकगीत… पण या गीतात त्यांचा स्वर विलक्षण संयमी, निर्मळ आणि भक्तिभावाने ओथंबलेला आहे. इथे शब्दांपेक्षा भावना बोलतात.
दुसरीकडे पं. सत्यशील देशपांडे यांच्या आवाजात शास्त्रीय संगीताची परंपरा, रियाज आणि गांभीर्य स्पष्ट जाणवत राहते. त्यांच्या आलापांनी गाण्याला एक वेगळी उंची प्राप्त होते. दोघांचे स्वर जणू दोन प्रवाह आहेत, जे एकत्र येऊन शांत, निर्मळ नदी बनतात.
या संपूर्ण गीताचा आत्मा आहे राग अहीर भैरव.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अहीर भैरव हा पहाटेचा राग मानला जातो. रात्र संपून दिवसाची चाहूल लागते, पक्ष्यांचे स्वर ऐकू येऊ लागतात, मंद प्रकाश क्षितिजावर पसरू लागतो, त्या वेळेचा हा राग. म्हणूनच या रागात एकाच वेळी गंभीरताही आहे आणि प्रसन्नताही.
भैरव रागाची स्थिरता आणि अहीर अंगाची कोमलता यांचा सुंदर संगम म्हणजे अहीर भैरव. कोमल ऋषभ आणि कोमल निषाद यांमुळे रागाला विलक्षण माधुर्य लाभते. विशेषतः ऋषभवरील मंद आंदोलन मनाला अंतर्मुख करते. हा राग कोणताही आवेग निर्माण करत नाही; तो मनाला हळूहळू शांत करत नेतो.
अनेक राग आनंद व्यक्त करतात, पण अहीर भैरवचा आनंद वेगळा आहे. तो उत्सवाचा गजर नाही. तो अंतर्मनात अलगद फुलणारा आनंद आहे. एखाद्या दीर्घ अंधारानंतर पहिल्या सूर्यकिरणाने जशी मनात आशा निर्माण होते, तसाच त्याचा स्वभाव आहे.
गाण्याची सुरुवात तानपुऱ्याच्या स्थिर, गंभीर नादाने होते. त्यावर उमटणारा पहिला स्वरच श्रोत्याला रागाच्या विश्वात घेऊन जातो. तबला, बासरी, स्वरमंडल आणि तंतुवाद्यांचा वापर अत्यंत मोजका आहे. कोणतेही वाद्य गायकीवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत नाही, वर्चस्व गाजवत नाही. ऐकणाऱ्याची कर्णेंद्रिये पूर्णतः स्वर आणि शब्द यांवरच केंद्रित होऊन राहतात.
वर्मनसाहेबांचे कौशल्य हे की हे गाणे ऐकताना असे भासत राहते की संगीतकाराने निव्वळ संगीत रचलेले नाहीत, तर ती रम्य पहाटेची वेळच स्वरांत उतरवलेली आहे.
या गीतातील प्रत्येक प्रतिमा भारतीय तत्त्वज्ञानाशी जोडलेली आहे. अंधारातून प्रकाशाकडे, अस्वस्थतेतून शांततेकडे, भ्रमातून ज्ञानाकडे आणि अहंकारातून समर्पणाकडे नेणारा हा प्रवास आहे. त्यामुळे हे गाणे केवळ भक्तिगीत राहत नाही, तर आत्मशोधाची एक संगीतमय अनुभूती बनते.
चित्रपटातील याचे चित्रणही तितकेच संयत आहे. कुठेही अनावश्यक नाट्य नाही, भव्यता नाही, कृत्रिमता नाही. दृश्य, संगीत आणि शब्द यांचा समतोल इतका सुंदर साधला आहे की श्रोत्याचे लक्ष केवळ भावविश्वाकडे जाते. पहाटे पहाटे शुचिर्भूत होऊन तानपुरा घेऊन बसलेली, केस मोकळे सोडलेली, शुभ्रवस्त्रा रेखा इतकी शालिन आणि सात्विक कधीच दिसली नसेल.
आजच्या वेगवान काळातही हे गीत ऐकले की वेळ जणू थोडा थांबतो. मनाची धावपळ कमी होते. काही क्षण स्वतःकडे पाहावेसे वाटते. हेच या गीताचे खरे यश आहे.
“मन आनंद आनंद छायो” हे फक्त एक चित्रपटगीत नाही. ते पहाटेच्या प्रकाशासारखे आहे. रोज उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे ते प्रत्येक वेळी नव्याने अनुभवता येते. वसंत देव यांचे चिंतनशील शब्द, अजित वर्मन यांचे अभिजात संगीत, आशा भोसले आणि पं. सत्यशील देशपांडे यांची अप्रतिम गायकी आणि राग अहीर भैरवचे निर्मळ सौंदर्य या सर्वांचा संगम या गीताला कालातीत बनवतो.
काही गाणी काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. पण काही गाणी काळालाच मागे टाकतात. “मन आनंद आनंद छायो” हे त्यापैकीच एक. हे गाणे ऐकताना आपण केवळ संगीत ऐकत नाही, तर आपल्या अंतर्मनात उगवणारी एक शांत पहाट अनुभवत असतो.
There is something uniquely special about Bengali cinema. It exists in a world of its own, where storytelling often rises above entertainment and becomes poetry, philosophy, and deeply felt human experience. Over the decades, masters like , , , , , , and have enriched Indian cinema with works that continue to inspire generations.
To that distinguished list, I would like to add another name, though perhaps not in the conventional sense. As a director, he made only one film. Yet as an art director, he helped shape the visual identity of some of Indian cinema’s most memorable films. That man was .
A four-time National Award-winning art director, Chanda was the creative force behind the visual worlds of films like , , , , , , Iruvar, Zubeidaa, Aks, Dasavathaaram, Ghajini, and Delhi-6. His contribution to Indian cinema was immense.
But this piece is not about Samir Chanda.
It is about the one and only film he directed: , or The Story of a River.
I discovered this film because of . As someone who has followed his work for years, I was naturally drawn to it. Yet what I found here was not the larger-than-life star millions recognize. This was something altogether different. Something quieter. More vulnerable. More profound.
And once again, Mithun did not disappoint.
In Bengali cinema, there are many films that never become major commercial successes, films that arrive quietly and leave without fanfare. Yet somehow they remain alive in the hearts of those who discover them. Ek Nadir Galpo belongs to that rare category.
While watching it, you gradually stop being an observer. At some unnoticed moment, your emotional distance disappears. You find yourself walking alongside a grieving father, sharing his loneliness, his memories, and his silent suffering.
Despite its title, The Story of a River is not really about a river.
Nor is it merely the story of a village.
It is the story of a father trying desperately to hold on to the memory of his daughter.
It is a story about grief that refuses to fade.
About love that survives loss.
About memories so deeply etched into the human heart that even time itself seems powerless against them.
More importantly, it is about a father’s determination to ensure that time never succeeds in erasing those memories.
Adapted from the literary world of renowned Bengali writer , the film feels like a deeply personal work of art. Knowing that this was Samir Chanda’s only directorial venture makes the experience even more moving. It feels as though a man who spent a lifetime creating visual worlds finally poured all his emotions, observations, and sensitivities into a single cinematic canvas.
The plot, on the surface, is deceptively simple.
Darkeshwar is a postmaster living in a small rural village. His life is ordinary, uncomplicated, and centered around one person: his beloved daughter, Anu.
The relationship between father and daughter is portrayed with remarkable tenderness. Nothing feels staged. Nothing feels forced.
For Anu, her father is her entire universe.
And for Darkeshwar, every breath carries the presence of his daughter.
But life has little regard for such beautiful bonds.
In a tragic accident, Anu drowns in the Kalaghai River.
And with that single moment, the entire emotional landscape of the film changes.
The colours seem to fade.
The sounds grow quieter.
Conversations become sparse.
An unbearable emptiness begins to fill the screen.
What follows is not simply a tale of mourning. It is the portrait of a man learning to live inside a wound that will never heal.
After losing his daughter, Darkeshwar becomes consumed by a single mission.
He wants the river that took Anu away from him to be renamed after her.
He wants the Kalaghai River to become the Anjana River.
At first glance, the demand appears irrational.
What difference could a name possibly make?
But as the film unfolds, we begin to understand.
Darkeshwar is not fighting to change a river’s name.
He is fighting against forgetting.
His greatest fear is not death.
His greatest fear is that one day people will stop remembering his daughter.
The river will continue to flow.
Seasons will continue to change.
Generations will come and go.
Life will move forward.
But if the river carries Anu’s name, then every utterance of that name will keep her alive in memory.
Every map, every conversation, every mention of the river will become an act of remembrance.
It is a heartbreaking idea, yet also an extraordinarily beautiful one.
And that idea forms the emotional core of the entire film.
At the center of this story stands Mithun Chakraborty, carrying the weight of the narrative almost entirely on his shoulders.
For many viewers, Mithun will always be remembered as the charismatic star of commercial cinema, the dancing sensation of Disco Dancer, the action hero who dominated Indian screens for decades.
But Bengali cinema has repeatedly revealed a very different side of him.
The actor who stunned audiences in , , , , and reaches perhaps his most emotionally devastating form in Ek Nadir Galpo.
Darkeshwar is not an easy character to portray.
He has no dramatic monologues.
He does not fight villains.
He does not ask for sympathy.
He simply exists within his grief.
And portraying grief without melodrama is among the hardest challenges an actor can face.
Mithun’s achievement here is extraordinary.
After Anu’s death, a profound emptiness settles across his face. There are moments when words become unnecessary because everything is already visible in his eyes.
His eyes seem to be searching constantly.
Searching through crowds.
Searching through memories.
Searching through a world that no longer contains the person he loves most.
Many of the film’s most powerful scenes involve him doing almost nothing. Sitting quietly. Looking into the distance. Walking alone.
Yet those silences speak louder than pages of dialogue.
Thousands of unspoken emotions flow through those moments and reach the audience with startling force.
What makes Mithun’s performance truly remarkable is its restraint.
Many actors would have chosen visible breakdowns, loud cries, and dramatic displays of sorrow.
Mithun chooses the opposite path.
Darkeshwar’s grief burns inward.
It remains trapped beneath the surface.
And because it is not openly expressed, it somehow becomes even more painful.
We do not merely witness his suffering.
We feel it.
One particularly moving sequence shows him wandering through government offices, trying endlessly to convince authorities to consider his request.
The delicate balance of hope and despair on Mithun’s face during these scenes is so authentic that the line between performance and reality almost disappears.
Gradually, Darkeshwar ceases to be just one man.
He becomes a symbol.
A representative of every parent who has lost a child.
A representative of every human being who has lost someone irreplaceable.
His struggle stops being personal.
It becomes universal.
The river itself functions as one of the film’s most important characters.
It is not merely a geographical feature.
It becomes a metaphor for time.
For life.
For death.
For memory.
The river never stops flowing.
People arrive.
People leave.
People die.
People are forgotten.
But the river continues.
And this is precisely why Darkeshwar’s battle feels so tragic.
He is not truly fighting the river.
Nor is he fighting bureaucracy.
He is fighting time itself.
He is fighting the terrifying possibility of oblivion.
He is fighting fate.
The cinematography by deserves special mention. It is among the film’s greatest strengths.
The camera does not merely record events.
It becomes a storyteller.
The vast landscapes of rural Bengal, endless green fields stretching toward the horizon, quiet rivers, muddy roads after rain, mist-covered mornings, and lonely evenings dissolving into darkness are captured with extraordinary sensitivity.
The audience does not simply watch these images.
They inhabit them.
Nature here is not a backdrop.
The river, rain, wind, fog, and open skies become emotional extensions of the characters themselves.
Reflections floating on water.
Boats drifting silently downstream.
Rain-soaked landscapes carrying an indescribable sadness.
The loneliness of a fading sunset.
Each image mirrors the inner lives of the characters.
Many scenes resemble paintings brought to life.
Every frame possesses beauty, but it is not superficial beauty.
It is beauty infused with sorrow, memory, and the slow erosion of time.
Complementing these visuals is the understated music of .
The music never seeks attention.
It never overwhelms.
Instead, it breathes alongside the film.
When emotions remain unspoken, the music gently fills the silence.
Its simplicity becomes its greatest strength.
A few haunting melodies, sparse instrumentation, and carefully placed notes deepen every emotional moment.
Sometimes the music intensifies the pain of separation.
Sometimes it offers a fragile glimpse of hope.
Sometimes it simply amplifies the loneliness already present within the frame.
Together, the cinematography and music create something deeply poetic, allowing the film to linger in the heart long after it ends.
The film travelled to several international film festivals and earned considerable critical appreciation. Critics praised its visual language, narrative style, and particularly Mithun Chakraborty’s astonishing performance.
Commercially, however, it never achieved significant success.
Perhaps that was inevitable.
This is not a film designed to entertain.
It is a film designed to be experienced.
Looking back today, Ek Nadir Galpo feels far greater than the story of a grieving father.
It is a meditation on memory.
A reflection on love.
A reminder that the people we lose never truly disappear as long as we continue to remember them.
At its heart lies a profoundly human question:
How far would we go to save someone we love from being forgotten?
For me, Darkeshwar remains one of the finest performances of Mithun Chakraborty’s career and one of the most deeply human characters in Indian cinema.
Long after the final frame fades away, his grief remains.
His river remains.
His daughter remains.
And perhaps that is the greatest triumph any work of art can achieve.
बंगाली चित्रपटसृष्टी ही एक निराळेच जग आहे. सत्यजित रे, मृणाल सेन, ऋत्विक घटक, तपन सिन्हा, ऋतुपर्णो घोष, अपर्णा सेन, श्रीजीत मुखर्जी, बुद्धदेव दासगुप्त या सारख्या मनस्वी दिग्दर्शकांनी भारतीय सिनेसृष्टीला अगदी भरभरून दिलेले आहे. या यादीत अजून एक नाव जोडायचे आहे मला. दिग्दर्शक म्हणून त्यांचा एकच चित्रपट आला, तोही बंगाली भाषेत. पण एक कला दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडबरोबरच तामिळ, मल्याळम, बंगाली आणि इतरही भाषांमधून त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. ते म्हणजे श्रीयुत समीर चंदा ! त्यांनी बॉलीवूडमधील अनेक भव्य आणि ऐतिहासिक चित्रपटांचे सेट डिझाइन केलेले आहेत, ज्यासाठी त्यांना ४ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळालेला आहे. रंग दे बसंती (२००६), ओमकारा (२००६), गुरु (२००७), दिल से.. (१९९८), क्रिश (२००६), रावण (२०१०) याचबरोबर इरुवर, झुबेदा, अक्स, दशावतारम, गझिनी, दिल्ली -६ असे अनेक चित्रपटांचे कलादिग्दर्शक म्हणून काम केलेला हा अवलिया. पण हा लेख त्यांच्याविषयीचा नाहीये. तो आहे त्यांनी दिग्दर्शित केलेल्या एकमेव चित्रपटावर….
त्यांनी दिग्दर्शक म्हणून केलेला एकमेव चित्रपट “एक नदीर गल्पो” अर्थात “एका नदीची गोष्ट”. माझं या चित्रपटाकडे लक्ष जाण्याचं कारण अर्थातच मिथूनदा होतं. आणि इथेही मिथुनदा निराश करत नाहीत. रादर या माणसाचे एक सर्वस्वी भिन्न, संवेदनशील, गंभीर रूप या चित्रपटात पाहायला मिळते.
बंगाली चित्रपटसृष्टीत असे बरेच चित्रपट आहेत की ज्यांचा फारसा गाजावाजा झालेला नाहीये, मोठे व्यावसायिक यश मिळालेले नाहीये, पण तरीही ते प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजून बसलेले आहेत. मिथुन चक्रवर्ती अभिनीत “एक नदीर गल्पो” हा त्यापैकीच एक अफाट चित्रपट आहे.
हा चित्रपट पाहताना आपला त्रयस्थपणा कधी गळून पडतो हे समजताच नाही. कुठल्यातरी एका बेसावध क्षणी आपणही त्या असहाय तरीही जिद्दीला पेटलेल्या बापाच्या मनातल्या अथांग दुःखाच्या प्रवासात सहभागी होतो. नाव जरी ‘एका नदीची कथा’ असले तरी हा चित्रपट म्हणजे (निव्वळ) नदीची कथा नाही, ती केवळ एका गावाचीही कथा नाही, तो एका बापाच्या आपल्या लेकीबद्दलच्या स्मृतींचा कोलाज आहे, तिच्या विरहाच्या स्मृतींची कथा आहे. अशा स्मृतींची, ज्या काळालाही पुसून टाकता येत नाहीत. रादर काळालाही त्या स्मृती पुसून टाकता येऊ नये म्हणून एका बापाने केलेली धडपड, त्याचा अट्टाहास हेच या चित्रपटाचे मूळ बीज आहे.
प्रसिद्ध कला-दिग्दर्शक समीर चंदा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांच्या कथासृष्टीतून जन्माला आला. समीर चंदा यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत कला-दिग्दर्शक म्हणून आदराने घेतले जाते. अनेक उत्कृष्ट हिंदी चित्रपटांच्या दृश्यरचनेमागे त्यांची प्रतिभा होती. मात्र दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेला हा एकमेव चित्रपट ठरला. त्यामुळे या चित्रपटाकडे पाहताना एखाद्या अनुभवी चित्रकाराने आपल्या आयुष्यातील सर्व संवेदना एकाच कॅनव्हासवर ओतल्याची भावना निर्माण होते.
चित्रपटाची कथा वरवर पाहता अत्यंत साधी आहे. दरकेश्वर नावाचा एक पोस्टमास्तर. छोटंसं गाव. त्याचं सर्वसाधारण माणसाप्रमाणे चाललेलं साधं आयुष्य, आणि त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू असलेली त्याची लाडकी मुलगी अनु.
वडील आणि मुलगी यांच्यातील नातं चित्रपटात ज्या सहजतेने उभं राहातं, ते पाहताना आपल्याला अभिनय पाहत असल्याची जाणीवही होत नाही. अनुसाठी तिचे वडील म्हणजे संपूर्ण विश्व असतात. तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत दरकेश्वर असतो आणि दरकेश्वरच्या प्रत्येक श्वासात अनु. पण आयुष्याला अशा नात्यांची फारशी पर्वा नसते. एका दुर्दैवी अपघातात अनु कलघाई नदीत बुडून मृत्यू पावते.
या एका प्रसंगानंतर चित्रपटाचा स्वरच बदलून जातो. आतापर्यंत पडद्यावर दिसणारे सगळे रंग जणू फिके पडायला लागतात. कानावर येणारे आवाज कमी होत जातात. संवाद कमी होतात. आणि लेक गमावलेल्या एका वडिलांच्या मनातली भयंकर पोकळी पडद्यावर आकार घेऊ लागते.
मुलीच्या मृत्यूनंतर दरकेश्वर एकच ध्यास घेतो. ज्या नदीने त्याची मुलगी हिरावून घेतली, त्या नदीचे नाव बदलून आपल्या लेकीच्या स्मृतीत “अंजना” ठेवावे, अशी त्याची मागणी असते. सामान्य माणसाला ही मागणी विचित्र वाटू शकते. नदीचे नाव बदलून काय होणार?
पण चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसतसे लक्षात येते की दरकेश्वर नदीचे नाव बदलण्याचा प्रयत्न करत नाहीये. तो विस्मृतीविरुद्ध लढतोय. त्याला भीती आहे की एक दिवस लोक त्याच्या मुलीला विसरतील.
नदी मात्र कायम वाहत राहील.
म्हणून तो नदीलाच मुलीचे नाव देऊ इच्छितो. जेणेकरून प्रत्येक वेळी, जेव्हा-जेव्हा, त्या नदीचे नाव घेतले जाईल, तेव्हा त्याच्या मुलीची आठवणही जागवली जाईल, जिवंत राहील.
या संपूर्ण चित्रपटाचा आत्मा मिथुनदांच्या अभिनयात सामावलेला आहे. हे सगळं कथानक त्यांनी एकहाती पेललेलं आहे.
मिथुनबद्दल बोलताना बहुतेक लोकांच्या डोळ्यांसमोर डिस्को डान्सर, कराटे खेळणारा एक (भौतिकशास्त्राला गुंडाळून खुंटीवर टांगणारा) फायटर हिरो किंवा लोकप्रिय स्टार उभा राहतो. पण बंगाली चित्रपटांनी वेळोवेळी त्यांच्या आतल्या विलक्षण अभिनेत्याला बाहेर आणले आहे. मृगया, ताहादेर कथा, स्वामी विवेकानंद, नोबेल चोर, त्रयी (त्रोयी), आमी सुभाष बोलची यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला तो संवेदनशील अभिनेता एक नदीर गल्पोमध्ये आपल्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला दिसतो.
दरकेश्वर हे पात्र अत्यंत अवघड आहे. कारण त्याच्या तोंडी फार मोठे संवाद नाहीत…. ते मिथुनदांच्या इतर नायकासारखे शत्रूशी लढत नाही. ते प्रेक्षकांची सहानुभूती मागत नाही. हे असे पात्र आहे की जे फक्त आपले दुःख जगत राहते आणि कसलाही मेलोड्रामा न करता, कुठेही भडकपणा येऊ न देता दुःखाचा पट निव्वळ अभिनयातुन उभा करणे अभिनयकलेतील सर्वात कठीण गोष्ट मानली जाते.
मिथुनदांनी दरकेश्वरच्या भूमिकेत जे साध्य केले आहे, ते विलक्षण आहे. मुलीच्या मृत्यूनंतर त्यांच्या चेहऱ्यावर आलेली पोकळी पाहताना, तिचे वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. दरकेश्वराच्या डोळ्यांत सतत एक शोध सुरू आहे. जणू गर्दीतही ते आपल्या मुलीला शोधत आहेत. अनेक दृश्यांमध्ये ते शांत बसलेले असतात, काही बोलत नाहीत, पण त्या शांततेतले , त्या मौनातले हजारो शब्द आपल्याही नकळत आपल्या मनावर, संवेदनावर चाल करून येतात तेव्हा भावना सुन्न करून टाकते. मिथुनदांचा या भूमिकेतील सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांच्या डोळ्यात जाणवत राहणारं ते तुटलेपण आणि विशेषतः अभिनयात दाखवलेला संयम…. अनेक कलाकार अशा प्रसंगांमध्ये मोठमोठ्याने रडतात, आक्रोश करतात, भावना उघडपणे व्यक्त करतात. मिथुनदाने मात्र उलट मार्ग निवडलाय यात. दरकेश्वराचे दुःख आतल्या आत जळत राहते, मनाला जाळत राहते. त्याचे दुःख सहसा व्यक्त होत नाही पण तरीही प्रत्येक क्षणी अगदी प्रकर्षाने जाणवत राहते.म्हणूनच तुमच्या – माझ्यासारखा प्रेक्षक त्यांच्या वेदनेशी जोडला जातो.
एका प्रसंगात दरकेश्वर सरकारी कार्यालयांच्या उंबरठ्यावर भटकताना दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर आशा आणि निराशा यांच्यात सतत होणारा संघर्ष मिथुन यांनी इतक्या सूक्ष्मतेने दाखवला आहे की त्या क्षणी अभिनय आणि वास्तव यांच्यातील सीमारेषाच मिटून जाते.
दरकेश्वर हळूहळू एका सामान्य माणसापासून प्रतीकात रूपांतरित होतो. तो त्या प्रत्येक आई – वडिलांचा प्रतिनिधी बनतो, ज्यांनी आपले मूल गमावले आहे. तो त्या प्रत्येक माणसाचा प्रतिनिधी बनतो ज्याने आयुष्यातील सर्वात प्रिय गोष्ट गमावली आहे.
आणि म्हणूनच त्याचा संघर्ष वैयक्तिक राहत नाही. तो सार्वत्रिक बनून जातो.
चित्रपटातील नदी हे देखील एक महत्त्वाचे पात्र आहे. ती केवळ एक भौगोलिक वास्तव नाही. ती काळाचे प्रतीक आहे. जीवनाचे प्रतीक आहे. मृत्यूचे प्रतीक आहे. ती सतत वाहते. तिचा प्रवाह कधी थांबत नाही. माणसं येतात, जातात, मरतात, विसरली जातात. पण नदी वाहत राहते.
याच कारणामुळे दरकेश्वरचा संघर्ष अधिक हृदयद्रावक वाटतो. तो प्रत्यक्षात नदीशी लढत नाहीये, तो शासनाशी, यंत्रणेशी देखील लढत नाहीये. तो काळाशी लढत असतो…. तो स्वतःच्या विस्मृतीशी, रादर विस्मृतीच्या भीतीशी लढत असतो. नियतीशी लढत असतो.
चित्रपटाचे छायांकन राजन कोठारी यांचे आहे. याचे छायांकन हे या चित्रपटाच्या सर्वांत प्रभावी आणि लक्षात राहणाऱ्या पैलूंपैकी एक आहे. कॅमेऱ्याने केवळ कथा टिपलेली नाही, तर तो स्वतः एक स्वतंत्र कथाकथनकार बनून प्रेक्षकांना त्या जगात घेऊन जातो. ग्रामीण बंगालचे विस्तीर्ण आणि निसर्गरम्य लँडस्केप, क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार शेतं, संथपणे वाहणारी नदी, तिचे अथांग पात्र, चिखलाने भरलेले ओले रस्ते, पावसाने भिजलेली काळी माती, धुक्याच्या पांढऱ्या चादरीत हरवून गेलेल्या सकाळी आणि हळूहळू काळोखात विरघळणाऱ्या उदास संध्याकाळी यांचे चित्रण इतके जिवंत आणि संवेदनशील आहे की प्रेक्षक केवळ ते पाहत नाही, तर ते अनुभवू लागतो.
विशेष म्हणजे निसर्ग येथे केवळ पार्श्वभूमी म्हणून उभा राहत नाही. नदी, पाऊस, वारा, धुके आणि मोकळे आकाश हे सर्व कथानकातील पात्रांइतकेच महत्त्वाचे घटक बनतात. नदीच्या पाण्यात उमटणारी पात्रांची प्रतिबिंबे, शांत पाण्यावर तरंगणाऱ्या होड्या, पावसाच्या सरींनी निर्माण होणारी विषण्णता आणि मावळत्या सूर्याच्या प्रकाशात दिसणारी एकाकीपणाची भावना, या सगळ्या गोष्टी पात्रांच्या अंतर्मनातील भावनांचे प्रतीक बनून पडद्यावर उलगडतात. अनेक दृश्ये अशी आहेत की ती एखाद्या संवेदनशील चित्रकाराच्या कॅनव्हासवरून थेट पडद्यावर उतरल्यासारखी वाटतात. प्रत्येक फ्रेममध्ये सौंदर्य आहे, पण ते केवळ डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य नाही; त्या सौंदर्यामध्ये जीवनाची वेदना, काळाची झीज आणि मानवी भावनांची सूक्ष्म स्पंदने दडलेली आहेत.
नचिकेता चक्रवर्ती यांचे संगीतही चित्रपटाच्या या काव्यात्म भावविश्वात अत्यंत सहजपणे आणि सुसंवादीपणे मिसळते. हे संगीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्याचा किंवा दृश्यांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत नाही. उलट ते कथानकाच्या श्वासात मिसळून जाते. ज्या क्षणी पात्रांच्या मनात न सांगितलेल्या भावना उसळत असतात, ज्या वेळी त्यांच्या नजरेतून शब्दांपेक्षा अधिक काही व्यक्त होत असते, त्या वेळी नचिकेतांच्या सुरावटी त्या भावनांना एक अतिरिक्त खोली आणि अर्थ प्रदान करतात.
संगीतातील साधेपणा हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. काही सुरेल धून, विरळ वाद्यसंगत आणि प्रसंगानुरूप येणाऱ्या स्वरांची हळवी साथ यामुळे चित्रपटातील भावनिक क्षण अधिक प्रभावी बनतात. कधी ते विरहाची जाणीव अधिक तीव्र करते, कधी आशेचा एखादा मंद किरण उजळवते, तर कधी पात्रांच्या मनातील एकाकीपणा आणि असुरक्षितता अधिक ठळकपणे जाणवून देते. त्यामुळे संगीत आणि छायांकन यांचा सुंदर मेळ साधला जातो आणि चित्रपटाला एक विलक्षण काव्यात्मक, हृदयस्पर्शी आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारा अनुभव प्राप्त होतो.
या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये स्थान मिळाले. समीक्षकांनी त्याच्या दृश्यभाषेचे, कथनशैलीचे आणि विशेषतः मिथुन चक्रवर्ती यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले. व्यावसायिकदृष्ट्या मात्र चित्रपटाला मोठे यश मिळाले नाही. त्याचे एक कारण त्याचा संथ, चिंतनशील स्वभाव होते. माझ्यामते हा चित्रपट मनोरंजनासाठी नाही; तो अनुभवण्यासाठी बनवलेला चित्रपट आहे.
आज “एक नदीर गल्पो” कडे मागे वळून पाहताना जाणवते की हा चित्रपट केवळ एका वडिलांच्या दुःखाची कथा नाही. तो एका पित्याच्या चिरंतन प्रेमाची कथा आहे. स्मृतीची कथा आहे. आणि माणूस आपल्या प्रिय व्यक्तींना विस्मृतीपासून वाचवण्यासाठी कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकतो, याची हि कथा आहे.
माझ्या मते मिथुनदांनी साकारलेला दरकेश्वर हि केवळ त्यांच्या कारकिर्दीतील एक उत्कृष्ट भूमिका, श्रेष्ठ अभिनयच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक वेदनादायी आणि मानवी वाटणाऱ्या व्यक्तिरेखांपैकी एक आहे. चित्रपट संपल्यानंतरही त्याचे दुःख, त्याची नदी आणि त्याची मुलगी प्रेक्षकाच्या मनात बराच काळ जिवंत राहतात आणि कदाचित हाच कोणत्याही महान कलाकृतीचा खरा विजय असतो.