Category Archives: आजची मेजवानी

जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें….

किसको सुनाएं हाले-दिले जोर ए, अदा,
आवारगी मै हमने जमाने की सैर की !

काबे में जा के भूल गया राह दैर की,
ईमान बच गया, मेरे मौला ने खैर की !

बारावीत असेन बहुदा तेव्हा. नुकतंच उर्दुचं वेड लागलं होतं. सोलापूरातल्या सिद्धेश्वर मंदीरापाशी असलेल्या पीरबाबाच्या दर्ग्यात बंदगी अदा करणार्‍या मौलवीसाहेबांकडून जमेल तसे उर्दु शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न चालू होता. तशाच एकदा कुठल्या तरी डाळ – तांदुळ बांधुन आलेल्या पुडीच्या कागदावर वरील ओळी वाचनात आल्या आणि मी थोडा आश्चर्यातच पडलो. ज्या कुणी शायराने हे लिहीलं होतं, “कमाल की उमदा चिज लिखी थी, फिरभी दुसरा शेर मुझे हैरत में डाल रहा था ”

‘काबे में जा के भूल गया राह दैर की’ इथपर्यंत ठिक होतं, पण ‘ईमान बच गया, मेरे मौला ने खैर की !’ या ओळी मला गोंधळात पाडत होत्या. मी थेट मौलवीसाहेबांना गाठलं.

‘चचाजान, मै समझ नही पा रहा हूं, इतना उमदा कलाम लिखने वाला शख्स आखीरमें इस तरहा, क्युं शिकायत कर रहा है? काबा जाकर मंदीर की गिरिजाघर की राह भूल जाना मै समझ सकता हूं लेकीन ‘मंदीर या गिरजाघरमें जाकर किसीका ईमान खराब हो जाये’ ये बात मुझसे हजम नही हो रही है…….

मौलवीसाहब हसले आणि हसून म्हणाले, ” बेटेजी, जशी तुमची मराठी आहे ना, तशीच उर्दुही आहे. तुम्ही काढाल तितके अर्थ निघतात शब्दांतून. और यहां तो लिखनेवाला एक बहोतही उमदा शायर है ! या ओळींचा अर्थ शब्दशः घेवु नकोस रे. मंदीर किंवा गिरीजाघर हे इथे कविने मुर्तीपुजा किंवा कर्मकांडाचे प्रतीक म्हणून वापरले आहे, तर ‘कामा’ हे ‘निराकार परमेशाचे’ स्वरूप म्हणून वापरले आहे. आता इथे लिहीणारा मुस्लीम आहे त्यामुळे त्याने आपल्याला हवी तशी लिबर्टी घेतलीय एवढंच. त्याच्या जागी एखादा इतर धर्मीय शायर असता तर कदाचीत शब्द वेगळे असले असते. पण जर अर्थच काढायचा झाला तर सरसकट अर्थ असा आहे की जेव्हा निराकार स्वरूपातील ईश्वराच्या पायावर लीन झालो तेव्हा मला कर्मकांडातला, अवडंबरातला फोलपणा कळून चुकला. बरं झालं , नाहीतर भलतीकडेच भरकटत गेलो असतो.”

‘वाह, है कौन ये शायर? कोण, आहे तरी कोण हा शायर?’

“बेटेजान, ये बात तो आजतक कोई दिलपें हाथ रखकें बता नही पाया, क्योंकी कुछ लोग मानते है के ये एक ‘शायर’का कलाम है , जहां कुछ लोग ये भी मानते है की ये एक ‘शायरा’की नज्म है! लेकीन जहां तक मै जानता हूं और मानता हुं, इस शायराका असलीयतमें कोई वजुद नही है! लेकीन शायर मियाने जिस तरहसे इस किरदार को शख्सीयत दी है की शायरी के दीवाने इस किरदार को भी सच मानते है! वे आजभी मानते है की …

“हां… उमराव जान असलमें हुआ करती थी! और ये उन्हीकी नज्मके कुछ शेर है! ‘उमराव जान’के गझलोमें ‘अदा’ उनका तखल्लुस हुआ करता था, मगर जहा तक मै जानता हुं ‘उमराव जान’ ‘मिर्जा मोहम्मद हादी रुस्वा’ साहबका सबसे खुबसूरत और ताकतवर शाहकार है! और जहा तक मेरा खयाल है ये लाईनेभी मिर्झा हादी रुस्वासाहबकी ही लिखी हुयी है! ये अलग बात है की उमरावके चाहने वाले आज भी इसे ‘उमराव जान’की नज्मही मानते है!”

मी चाट पडलो. मी स्वतः “उमराव जान’ २-३ वेळा पाहीला होता. त्यातली गाणी पुन्हा-पुन्हा वेड्यासारखी ऐकली होती. खरेतर मी देखील तोपर्यंत असेच समजत होतो की ‘उमराव जान’ हे पात्र सत्यकथेवरच आधारीत आहे. खरं खोटं मिर्जा हादीसाहेबच जाणोत, पण एवढी अर्थपुर्ण शायरी करणारा हा माणूस किती ग्रेट असेल.

असो…., आज हे सगळं अचानक आठवायचं कारण म्हणजे आज सकाळी फेसबुकवर क्रांतिताईने ‘उमराव जान’ मधलं एक गाणं शेअर केलं होतं.

जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें….

जिन्दगी जब भी तेरी बज्म में लाती है हमे
ये जमी चाँद से बेहतर नजर आती हैं हमे

सूर्ख फूलों से महक उठाती हैं दिल की राहे
दिन ढले यूँ तेरी आवाज बुलाती हैं हमे

याद तेरी कभी दस्तक,कभी सरगोशी से
रात के पिछले पहर रोज जगाती हैं हमे

हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यों है
अब तो हर वक्त यही बात सताती हैं हमे

‘शहरयार’ साहेबांच्या लेखणीतून उतरलेले जादुई शब्द, त्याला खय्यामसाहेबांचा वेड लावणारा स्वरसाज. अजुन काय हवं हो रसिकाला? शायर म्हणतो की जिंदगी, हे आयुष्य जेव्हा जेव्हा मला तुझ्या सहवासाचा लाभ मिळवून देतं, म्हणजेच जेव्हा जेव्हा मी तुझ्या सहवासात असतो तेव्हा ही धरती मला चंद्रापेक्षाही सुखकर वाटायला लागते…

या ओळी वाचल्या की मला राहून राहून ‘मोमीन्’साहेबांची आठवण यायला लागते, ते म्हणतात…

“तुम मेरे पास होते हो गोया जब.., कोई दूसरा नहीं होता ”

तसं तर ‘उमराव’ची सगळी गाणी अफाटच होती. मुळातच ‘शहरयार आणि खय्याम’ या दोन अल्लाहच्या माणसांनी या चित्रपटाच्या संगीताला खुप वरच्या स्थानावर नेवून ठेवलं होतं, त्यात रेखाचं मादक सौंदर्य, अप्रतीम अदाकारी आणि आशाबाईंचे खुळावून टाकणारे स्वर ! ‘उमराव जान’च्या संगीताने सगळे विक्रम तोडले नसते तरच नवल.

पण हे गाणं गायलं होतं मखमली आवाजाच्या “तलत अझीज”ने आणि ‘तलत अझीज’ कुठेही निराश करत नाही हे गाणे ऐकताना…!

‘सोने पें सुहागा’ म्हणजे हे गाणं ऐकताना, खासकरून पाहताना, ‘ दो घडी वो जो पास आ बैठे’ पहतानाचा अनुभव अजिबात येत नाही. उलट रेखाच्या चेहर्‍यावरचं मोहात पाडणारं लावण्य डोळे भरून पाहात राहावं की देखण्या फारुख शेखच्या बोलक्या चेहर्‍यावरचे झरझर बदलत जाणारे भाव टिपत राहावं हेच कळत नाही.

बस्स… मै अपनी बकबक बंद करता हूं और आपको कर देता हूं खय्याम साहब और शहरयारसाहब के हवाले ! जिनको गाना सुनना है वो मौसिकीकार, शायर और गझलगायक की इस खुबसुरत पेशकशका लुत्फ उठाये और जो लोक ‘शहरयार’साहबकी शायरीकें इस तिलिस्मसें बाहर निकलनेमें कामयाब हो जाये वो ‘मोहतरमा रेखा और मिया फारुख के हंसीन रोमान्स पें निसार हो जाये !

अवांतर : २००६ मध्ये जे.पी. दत्ताने ‘उमराव जान’चा रिमेक केला तेव्हा त्याने रेखाच्या सौंदर्याला पर्याय म्हणून ऐशचा वापर केला, काही प्रमाणात तो ठिक होता. (५ ते ७%), पण फारुख शेखच्या (नवाब सुलतानमियाच्या) भुमिकेसाठी अभिषेक बच्चन (?) तिथेच सिनेमाची अर्धी वाट लागली असावी 😉

विशाल….

एक मस्त हिरवागार विकांत….

पुण्याला आल्यापासून सहा महिन्यातून एकदातरी आई-आण्णांना भेटण्यासाठी म्हणून सोलापूरची चक्कर होतेच. आधी मुंबईला असताना लांब पडत असल्याने हेच प्रमाण वर्षातून एकदा असं होतं. आता इथे कसं ऑफीस संपल्यावर निघालं तरी रात्री दहा-साडे दहा पर्यंत घरी पोहचता येतं. त्यामुळे घरचे दौरे वाढलेय. आईसाहेब खुश आहेत. प्रत्येक वेळी सोलापुरी गेलं की जुन्या मित्रांपैकी कुणाला तरी फोन करायचा, शक्य असेल तर सगळेच ठरवून एका ठिकाणी भेटायचं, किमान एकाला तरी भेटायचच असा नियम ठरवून घेतलाय मी आता. पण यामुळे झालं असं की नातेवाईक शिव्या घालायला लागले. त्यामुळे यावेळेस सोलापूरी गेल्यावर सगळ्यात आधी आमच्या आत्याबाईंसाठी वेळ काढायचं ठरवलं. खरंतर ही आत्या (सुमनआत्या) माझी लाडकी आत्या आहे. माझं लहानपण माझ्या आईपेक्षा आत्याच्या कडेवर जास्त गेलय त्यामुळे तिच्याकडे प्रथमपासुनच जास्त ओढा आहे माझा. यावेळी आत्याबाईंना भेटल्यावर तिने तिच्या शेतावर जायची टुम काढली.

सोलापूरपासुन ६० किमी वर असलेलं ’उडगी’नामक कन्नड गाव हे माझ्या आत्याचं सासर. तसे मामा प्रथमपासून सोलापूरातच असतात, पण गाव जवळच असल्याने ते स्वत:च शेतीकडे लक्ष ठेवुन असतात. तर यावेळी उडगीला जायचा बेत ठरला. घरातून सकाळी लवकर निघायचं. रस्त्यात आधी लागणार्‍या ‘प्रज्ञापूरीत’ (अक्कलकोट) थांबून श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढे जायचं असा बेत ठरला. ठरल्याप्रमाणे माऊलींचे दर्शन घेवुन उडगी गाठले.

शेताच्या सुरुवातीलाच मामांचा जुना कोठा (वाडा) आहे. तिथे थोडा वेळ विसावलो. वाटेकर्‍याच्या कारभारणीने दिलेले चहा-पाणी घेवून भटकंतीसाठी निघालो.

1

समोरच हिरव्यागार उसाचं वावर पसरलेलं होतं. त्यातून वाट काढत पुढे निघालो.

2

3

4

5

उस संपला आणि जोंधळ्याची पट्टी सुरू झाली.

6

7

8

9

मामांनी यंदा शेतात उस, र गहु,  ज्वारी केलेली आहे. उपलब्ध पाणी उसालाच पुरे पडत नसल्याने जवळजवळ बरीच जमीन पडून आहे. नाही म्हणायला इतर काही कोरडवाहू पिके घेतलेली आहेत. पण ती तुरळक प्रमाणात.

गव्हाची नुकतीच जोम धरू लागलेली रोपं…

10

सद्ध्या रानात एकुण दोन विहीरी आहेत. तिसरीचं काम सुरू आहे…

11

नव्याने होवू घातलेल्या विहीरीच्या शेजारीच एक छोटीशी पत्र्याची शेड आहे. तिथेच बाहेर एका झाडाखाली चालून दमलेल्या स्त्री-वर्गाने बस्तान ठोकलं. आता पुढे येणार नाही, तुमचे तुम्ही या फिरून असं जाहीर करून दोन्ही धाकट्या (आत्या पण कुलकर्णीच आहे , म्हणून ती मोठी) कुलकर्णींजनी (सौ. सायली विशाल व सौ. कृपा विनीत (माझ्या धाकट्या भावाची पत्नी)) तिथेच सतरंजीवर बैठक घातली. पण आत्याने पुढे बोराची झाडे आहेत असे सांगितल्यावर त्यांचा बेत पुन्हा बदलला. तरी आलेला थकवा दूर करण्यासाठी म्हणून थोडा अस्सल रानमेव्याचा अल्पोपहार घेवून पुढे जायचे असे आत्याबाईंनी सांगितल्यामुळे दोघीही खुश झाल्या. अजुन हुरडा झालेला नसल्यामुळे मग कोवळी तूर, हरभरा (ढाळा), पेरू, बोरं अशा रानमेव्यांवर सगळेच तुटून पडलो.
ते संपल्यावर गड्याने उसाची मोळी समोर आणून टाकली…. (पुढे काय झाले ते कृपया विचारू नये, मला कुणीही अधाशी, हावरट म्हटलेले अजिबात आवडत नाही wink )

12

छानपैकी पोटोबा झाल्यावर पुढच्या भटकंतीसाठी रवाना झालो. मामा शिक्षणाने सिव्हील इंजीनीअर. सद्ध्या सोलापुर टाऊन प्लानींगकडे डिपार्टमेंटमध्ये सिनीयर टाऊन प्लॅनर म्हणून कार्यरत आहेत.पण शेती ही पहिली आवड असल्याने तोपर्यंत ते अंगावरचे शहरी कपडे उतरवून कर्नाटकी पद्धतीची लुंगी चढवून, ती गुडघ्याच्या वर गुंडाळून घेवून जोंधळ्याच्या शेतात शिरले होते. तिथे लावलेल्या स्प्रिंकलरला काहीतरी समस्या आलेली होती. त्यांनी तिकडूनच हाक मारली. तिकडे जाताना मामांची खरी दौलत नजरेत आली…

हिच खरी दौलत !

13

14

16
पुढची पिढी…

15

आम्ही तिकडे पोहोचेपर्यंत मामांनी आणि गड्यांनी खटपट करून स्प्रिंकलर चालू केलेला होता.

17

18

त्याच्या जवळुन जाताना नकळत अंगावर पाण्याचे ते तुषार उडाले आणि बायकांची धावपळ झाली. नाय, नाय.. पाण्यापासून दुर पळायची नाय, तर त्या स्प्रिंकलर्सच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन भिजण्याची. तिथे थोडावेळ पाण्यात (आणि पायाखालच्या चिखलात) मस्ती झाल्यावर पुढे निघालो. थोड्यात वेळात तिथे जाऊन पोचलो ज्यासाठी त्यांनी आपला बेत बदलला होता.

19

20

21

भरपूर बोरं खाऊन आणि गोळा करुन झाल्यावर मग पुन्हा मागे फिरायचे ठरले. कारण यापुढे बहुतेक जमीन रिकामीच होती पाण्याच्या अभावामुळे. तरीही येताना परत रस्त्यात आता काढायला आलेली तूर भेटलीच..

22

23

दुपारचे तीन वाजायला आले होते. भरपूर फिरल्यामुळे परत पोटात कावळे कोकलायला लागले होते. आत्याबाईंनी खादाडीचाही जंगी बंदोबस्त केलेला होता. बाजरीच्या पातळ कडक भाकरी, खरडा, शेंगदाण्याची चटणी, तेलमीठावर परतून घेतलेली कोवळी गवार, मेथीची सुकी भाजी, ढोबळी मिरच्यांची सुकी भाजी, मेथी-पालकची पातळ भाजी आणि शेवटी त्यांचं (कर्नाटकी लोकांचं) खास “चित्रान्न” असा जंगी बेत होता. तोंडी लावायला ढाला, बोरं, पेरु अस्सल ‘ग्रीन सलाद’ही होतंच.

24

25

खादाडी आटोपल्यानंतर तिथेच एका झाडाखाली मस्त सावलीत, गवतावरच जे ताणुन दिली ते थेट पाच वाजताच उठलो.

26

पुन्हा कोठ्यावर येवून गरमागरम चहा घेतला आणि हुरड्याला परत यायचं असं मनाशी पक्कं ठरवून परतीच्या वाटेला लागलो.

विशाल…